Header Ads Widget

Responsive Advertisement

तानसा (पश्चिम) मुख्‍य जलवाहिनीवर अकस्मात उद्भवलेल्या गळतीमुळे

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 तानसा (पश्चिम) मुख्‍य जलवाहिनीवर अकस्मात उद्भवलेल्या गळतीमुळे

एच पूर्व, के पूर्व, जी उत्तर आणि एस विभागाच्‍या पाणीपुरवठ्यावर परिणाम

शुक्रवार, दिनांक २३ ऑगस्‍ट २०२४ आणि शनिवार, दिनांक २४ ऑगस्‍ट २०२४ रोजी काही ठिकाणी कमी दाबाने तर काही ठिकाणी पाणीपुरवठा रहाणार बंद

गळती दुरूस्‍तीची कार्यवाही युद्धपातळीवर सुरू

संबंधित परिसरातील नागरिकांनी पाणी जपून व काळजीपूर्वक वापरण्याचे आवाहन

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या तानसा (पश्चिम) मुख्‍य जलवाहिनीला पवई येथे आज शुक्रवार, दिनांक २३ ऑगस्‍ट २०२४ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास आकस्मिकरित्या मोठी गळती लागल्‍याचे आढळून आले. जल अभियंत्‍या खात्‍याच्‍या अधिकारी - कर्मचा-यांनी घटनास्‍थळी तात्‍काळ धाव घेत या गळतीवर पूर्णपणे नियंत्रण मिळविले आहे. त्‍यानंतर दुरुस्तीचे कामकाज देखील युद्ध पातळीवर सुरू करण्‍यात आले आहे. असे असले तरी दुरूस्‍तीसाठी लागणारा कालावधी पाहता एच पूर्व, के पूर्व, जी उत्तर आणि एस विभागातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे. त्‍यामुळे शुक्रवार, दिनांक २३ ऑगस्‍ट २०२४ आणि शनिवार, दिनांक २४ ऑगस्‍ट २०२४ रोजी काही ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. तर काही ठिकाणचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. संबंधित भागातील नागरिकांनी याची नोंद घेऊन पाणी काटकसरीने वापरावे व महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.


पवई येथे आरे वसाहतीजवळच्‍या गौतम नगर परिसरात १८०० मिलीमीटर व्यासाच्‍या तानसा (पश्चिम) मुख्य जलवाहिनीवर आज (दिनांक २३ ऑगस्‍ट २०२४) दुपारी १ वाजेच्‍या सुमारास आकस्मिकरित्या मोठी गळती लागल्‍याचे आढळून आले. त्‍याची माहिती मिळताच, सहायक अभियंता नगर बाह्य (प्रमुख जलवाहिन्‍या) विभागाच्‍या अधिकारी, कर्मचारी, कामगारांनी तात्‍काळ तेथे जाऊन जलवाहिनीवरील झडप (व्‍हॉल्‍व्‍ह) बंद करून पाणी गळती बंद केली. तानसा (पश्चिम) जलवाहिनीचा पाणीपुरवठा तात्पुरत्या स्वरूपात बंद करून दुरुस्ती कामदेखील युद्ध पातळीवर हाती घेण्यात आले आहे. पुढील सुमारे २४ तास हे काम सुरू राहण्‍याची शक्यता आहे. आकस्मिक रित्या उद्भवलेल्या या गळतीमुळे एच पूर्व, के पूर्व, जी उत्तर आणि एस विभागातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे. प्रामुख्‍याने शुक्रवार, दिनांक २३ ऑगस्‍ट २०२४ आणि शनिवार, दिनांक २४ ऑगस्‍ट २०२४ रोजी काही ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा होईल तर काही ठिकाणी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्‍याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

के पूर्व विभाग–

- प्रकाशवाडी, गोविंदवाडी, मालपा डोंगरी १/२, हनुमान नगर, मोटा नगर, शिवाजी नगर, शहीद भगतसिंग वसाहत (अंशतः) , मुकुंद रुग्णालय, टेक्निकल परिसर, इंदिरा नगर, मापकंद नगर, टाकपाडा, विमानतळ मार्ग, चिमटपाडा, सानबाग, मरोळ, एम. आय. डी. सी. परिसर, रामकृष्ण मंदीर मार्ग, जे. बी. नगर, बागरखा मार्ग, कांती नगर (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ दुपारी २.०० ते सायंकाळी ५.३०) (पाणीपुरवठा बंद राहील)

- सहार रोड, कबीर नगर, बामणवाडा, पारशीपाडा, विमानतळ वसाहत, तरुण भारत वसाहत, इस्लामपुरा, दौलतवाडी, पी. एन. टी. वसाहत (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ दुपारी २.०० ते सायंकाळी ५.३०) (पाणीपुरवठा बंद राहील)

- मिलिटरी मार्ग, विजय नगर, मरोळ-मरोशी मार्ग (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ पहाटे ५.३० ते सकाळी ९.३०) (पाणीपुरवठा बंद राहील)

- मुलगाव डोंगरी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एम. आय. डी. सी.) मार्ग क्रमांक १ ते २३, ट्रान्स अपार्टमेंट, कोंडिविटा, उपाध्याय नगर, ठाकूर चाळ, साळवे नगर, वाणी नगर, दुर्गापाडा, मामा गॅरेज (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ सकाळी ११.०० ते दुपारी २.००) (पाणीपुरवठा बंद राहील)

- ओम नगर, कांती नगर, राजस्थान गृहनिर्माण संस्था, साईनगर, सहार गांव, सुतार पाखाडी, कार्गो संकुल (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ पहाटे ५.०० ते सकाळी ८.१५) (पाणीपुरवठा बंद राहील)

एच पूर्व विभाग–

- वांद्रे रेल्वे टर्मिनस परिसर, बेहरामपाडा (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ २४ तास) (पाणीपुरवठा बंद राहील)

जी उत्तर विभाग–

- धारावी (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ पहाटे ४.०० ते दुपारी १२.०० आणि दुपारी ४.०० ते रात्री ९.००) (पाणीपुरवठा बंद राहील)

एस विभाग-

- गौतम नगर, जयभीम नगर (२४ तास पुरवठा) (पाणीपुरवठा बंद राहील)

- फिल्टरपाडा, बेस्ट सर्कल, गावदेवी, इस्लामिया चाळ (सकाळी ७.०० ते सकाळी ११.००) (पाणीपुरवठा कमी दाबाने राहील)

- पठाणवाडी, महात्मा फुले नगर (२४ तास पाणीपुरवठा) (पाणीपुरवठा कमी दाबाने राहील)

- कैलास नगर, पासपोली गाव, निटी परिसर, अमृत हॉटेल लगतचा परिसर (२४ तास पाणीपुरवठा) (पाणीपुरवठा कमी दाबाने राहील)

संबंधितांनी कृपया याची नोंद घेऊन पाणी जपून व काटकसरीने वापरावे व महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाद्वारे करण्यात येत आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Post a Comment

0 Comments